MARATHI NEWS BCCHU KADU WANTS DECLARE WEIGHT DROUGHT
MARATHI NEWS BCCHU KADU WANTS DECLARE WEIGHT DROUGHT 
बातम्या

VIDEO | शेतकऱ्यांचा भिडू, बच्चू कडूंचा बळीराजासाठी आसूड मोर्चा

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानाने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा गुरुवारी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवत बच्चू कडू यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना राज्यपालांनी भेट नाकारल्याबद्दल शेतकरी नेते राजू शेट्‌टी यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. राज्यपाल हे राजकीय पक्षाचे आमदार व नेत्यांना भेटतात; मात्र, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्यात सरकार नसताना दाद कोणाकडे मागायची? प्रशासकीय अधिकार राज्यपालांकडे आहेत. ते शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नसतील तर त्यांनी सूत्रे हातात कशाला घ्यायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.  शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी राजभवनावर धडक मोर्चाचे आयोजन आज केले होते. हा मोर्चा राजभवनवर जाण्याआधीच अडवला गेला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. Web Title: Declare wet drought bacchu kadu

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer AC Tips: उन्हाळ्यातील एसीचे भरमसाठ बिल येतयं का? 'या' पद्धतींने करा कमी

IMD Alert: सावधान! येत्या ३६ तासांत समुद्र बेभान होणार; उंच लाटा उसळणार, कारण काय?

बाबो, अधिकारी महिलेकडं घबाडच सापडलं! मुंबई एअरपोर्टवर 25 किलो सोनं जप्त | Mumbai Airport

AC Tips and Tricks : उन्हाळ्यात AC ऑन करण्याआधी 'या' गोष्टी करा; अन्यथा तुम्हालाही लाईट बिल जास्त येईल

Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

SCROLL FOR NEXT